Megablock : मुंबईत २७ तास मेगाब्लॉक!

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर ब्रिटीशकालीन कर्नाक बंदर पूल पाडण्यासाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. ब्लॉक दरम्यान, सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वेसेवा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवार सकाळी ६.३० पर्यंत बेस्टकडून १२ अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.


 

कर्नाक पूल पाडण्याचे काम शनिवार १९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या ब्लॉक (Megablock) कालावधीत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.



सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची रेल्वे वाहतून मध्य रेल्वेने पूर्णपणे बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १२ अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवारी इतर काही मार्गावर बेस्टच्या आणखी ३५ गाड्या चालवल्या जाणार आहे.



बेस्ट उपक्रमाकडून विशेष नियोजन


> ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाकडे दादर, परेल, भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याची मागणी केलेली आहे.


> या मागणीनुसार बेस्टने १९ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


> बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार, बस क्रमांक १ सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व आणि बस क्रमांक २ भायखळा पश्चिम ते कुलाबा आगारापर्यंत १२ गाड्या सोडण्यात येतील.


> बस क्रमांक ११, सी १०, १४, ए-१७४, ए४५ अशा एकूण ३५ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.


> एसटी महामंडळाकडून नियोजन सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाड्या सोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल