Megablock : मुंबईत २७ तास मेगाब्लॉक!

  99

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर ब्रिटीशकालीन कर्नाक बंदर पूल पाडण्यासाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. ब्लॉक दरम्यान, सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वेसेवा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवार सकाळी ६.३० पर्यंत बेस्टकडून १२ अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.


 

कर्नाक पूल पाडण्याचे काम शनिवार १९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या ब्लॉक (Megablock) कालावधीत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.



सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची रेल्वे वाहतून मध्य रेल्वेने पूर्णपणे बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १२ अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवारी इतर काही मार्गावर बेस्टच्या आणखी ३५ गाड्या चालवल्या जाणार आहे.



बेस्ट उपक्रमाकडून विशेष नियोजन


> ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाकडे दादर, परेल, भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याची मागणी केलेली आहे.


> या मागणीनुसार बेस्टने १९ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


> बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार, बस क्रमांक १ सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व आणि बस क्रमांक २ भायखळा पश्चिम ते कुलाबा आगारापर्यंत १२ गाड्या सोडण्यात येतील.


> बस क्रमांक ११, सी १०, १४, ए-१७४, ए४५ अशा एकूण ३५ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.


> एसटी महामंडळाकडून नियोजन सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाड्या सोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.