Ladakh : लडाखमध्ये ५० हजार भारतीय जवान तैनात

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) : चीनच्या कुरापतींचा धोका लक्षात घेता भारताने लडाखमध्ये (Ladakh) आपले सैन्य तैनात केले आहे. पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) डेमचोक आणि देपसांगमध्ये ५० हजार जवान तैनात करण्यात आले असून थंडीच्या कठीण परिस्थितीत शस्त्रे, रसद आणि इतर वस्तूंच्या पूर्ततेची व्यवस्था करण्यात आली आहेत.


एलएसीवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या पोशाखासाठी १ लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. गलवानमध्ये मे २०२० मध्ये चीनने हल्ला केला. त्यानंतर हिवाळ्यात संपूर्ण सतर्कता पाळण्यात येते. सैन्याच्या तयारीचे हे त्यानंतरचे तिसरे वर्ष. गलवाननंतर भारत-चीनमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या. तरीही चीन आपले सैन्य गलवानमधून मागे घेण्यास तयार नाही.


जवानांसाठी थ्री लेअर पोशाख, खास तंबू उभारण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात भारतीय जवानांसाठी स्पेशल थ्री लेअर पोशाख देण्यात आला आहे. आउटपोस्टवर थंडीपासून संरक्षणासाठी खास थर्मो टेंट लावण्यात आले आहेत. खास डाएट सप्लिमेंटही देण्यात येत आहेत. पँगॉन्ग झीलपासून हॉट स्प्रिंगपर्यंत बीआरओने २० कि.मी. रस्ता बनवला आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान