Ladakh : लडाखमध्ये ५० हजार भारतीय जवान तैनात

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) : चीनच्या कुरापतींचा धोका लक्षात घेता भारताने लडाखमध्ये (Ladakh) आपले सैन्य तैनात केले आहे. पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) डेमचोक आणि देपसांगमध्ये ५० हजार जवान तैनात करण्यात आले असून थंडीच्या कठीण परिस्थितीत शस्त्रे, रसद आणि इतर वस्तूंच्या पूर्ततेची व्यवस्था करण्यात आली आहेत.


एलएसीवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या पोशाखासाठी १ लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. गलवानमध्ये मे २०२० मध्ये चीनने हल्ला केला. त्यानंतर हिवाळ्यात संपूर्ण सतर्कता पाळण्यात येते. सैन्याच्या तयारीचे हे त्यानंतरचे तिसरे वर्ष. गलवाननंतर भारत-चीनमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या. तरीही चीन आपले सैन्य गलवानमधून मागे घेण्यास तयार नाही.


जवानांसाठी थ्री लेअर पोशाख, खास तंबू उभारण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात भारतीय जवानांसाठी स्पेशल थ्री लेअर पोशाख देण्यात आला आहे. आउटपोस्टवर थंडीपासून संरक्षणासाठी खास थर्मो टेंट लावण्यात आले आहेत. खास डाएट सप्लिमेंटही देण्यात येत आहेत. पँगॉन्ग झीलपासून हॉट स्प्रिंगपर्यंत बीआरओने २० कि.मी. रस्ता बनवला आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे