Anjali Damania : अत्यंत नीच दर्जाचे राजकारण : अंजली दमानिया

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची बाजू उचलून धरत हा सर्व प्रकार अत्यंत नीच पातळीवरील राजकारण असल्याची टीका केली आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.



Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा


यावेळी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाचा गुन्हा अयोग्य असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर सध्या अतिश्य लाजिरवाणे आरोप होऊ लागले आहेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जराही आस्था नाही. पण मी कालचा व्हिडिओ दहावेळा पाहिला. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगासारखी कुठलीही कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी अमूक ठिकाणी हात लावला, माझा विनयभंग केला, हे म्हणणे चूक आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. महाराष्ट्रात सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे. हे नीच राजकारण थांबले पाहिजे, अशी पुस्तीही दमानिया यांनी जोडली.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून