तेलंगणा : लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? त्यावर मी रोज २-२ किलो शिव्या खातो म्हणून थकत नाही. देवाच्या आशीर्वादाने मला दिलेल्या शिव्या न्यूट्रीशनमध्ये बदलतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी तेलंगणा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता ते भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणात सहभागी असल्याचे म्हटले आहे. राज्याला ‘कुटुंब नव्हे, प्रथम जनतेचे’ सरकार हवे आहे. तुम्ही मोदींना शिव्या द्या, भाजपाला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिव्या दिल्या तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.
मला तेलंगणातील कामगारांसाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करायची आहे, असे कार्यकर्त्यांना आवाहन करत ते म्हणाले की, हताश, भीती आणि अंधश्रद्धेतून काही लोक मोदींच्या विरोधात अनेक शिव्या देतील. त्यांच्या फसवणुकीमुळे दिशाभूल होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…