ठाकरे गटाचे आमदार, खासदार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात

  116

पुन्हा राजकीय उलथापालथ होणार?


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नव्हे, तर खासदार आणि अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री येऊन भेटतात, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यामुळे जाधव यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, खासदार रात्री गुपचूप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. मी स्वतः त्या ठिकाणी हे अनुभवलेले आहे. ही गोष्ट खरी आहे. आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतातच, असा दावा त्यांनी केला.


खासदार जाधव यांनी यापू्र्वीही असाच एक गौप्यस्फोट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत.


दरम्यान आता ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते कधीही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जातील असे अनेक नेते म्हणतात. त्यामुळे ठाकरे गट पून्हा फूटणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.


प्रतापराव जाधवांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. पुढे ते म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री भेटत असतात. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार