ठाकरे गटाचे आमदार, खासदार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात

पुन्हा राजकीय उलथापालथ होणार?


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नव्हे, तर खासदार आणि अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री येऊन भेटतात, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यामुळे जाधव यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, खासदार रात्री गुपचूप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. मी स्वतः त्या ठिकाणी हे अनुभवलेले आहे. ही गोष्ट खरी आहे. आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतातच, असा दावा त्यांनी केला.


खासदार जाधव यांनी यापू्र्वीही असाच एक गौप्यस्फोट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत.


दरम्यान आता ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते कधीही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जातील असे अनेक नेते म्हणतात. त्यामुळे ठाकरे गट पून्हा फूटणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.


प्रतापराव जाधवांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. पुढे ते म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री भेटत असतात. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही ठेवले बोट; विरोधकांना सुनावले खडेबोल सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ratnagiri News : धर्मस्थळाला काळिमा! रत्नागिरीतील आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अन्य पीडितांची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये (Khed, Ratnagiri) एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे,