राज्यातल्या ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

१८ डिसेंबरला मतदान; २० डिसेंबरला निकाल


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.


काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. आता २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.



असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम


तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर


अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर


अर्ज छाननी : ०५ डिसेंबर


अर्ज मागे घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर


निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर


मतदानाची तारीख : १८ डिसेंबर


मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर


निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर

Comments
Add Comment

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

Prakash Bharsakhale : अकोटमधील MIM सोबतच्या युती प्रकरणी आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

अकोट : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार

Imtiaz Jalil vehicle Attack : मोठी बातमी : भर रस्त्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर सपासप वार केले अन्... थोडक्यात बचावले; संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली

Dharashiv News : पत्नी ने प्रियकराच्या मदतीने अपल्याच पतीला संपवल;दगडाने ठेचून हत्या..!

धाराशिव :उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी येथील रस्त्यावर एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार धारदार हत्यार आणि

Devendra Fadanvis : महत्वाची बातमी : काँग्रेस-MIM सोबतची युती अजिबात खपवून घेणार नाही; नेत्यांची खैर नाही, देवेंद्र फडणवीस भडकले; आता थेट....

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या

शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण