'हर हर महादेव' वर काहीही बोलू नका

मुंबई : दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित 'हर हर महादेव' या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल पुणे आणि मुंबईसह ठाण्यातील काही थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. चित्रपट आणि त्याच्यावरुन सुरु झालेला वाद यावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे.


या सगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरु झाला होता. अखेर त्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट फर्मान काढले आहे. त्यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरेंनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत काहीही बोलू नका, असे सांगितले आहे.


संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हर हर महादेव या चित्रपटाबाबत भाष्य केले होते. त्यामध्ये ऐतिहासिक घडामोडींवरुन वाद निर्माण झाला होता. हर हर महादेवमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसनं संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठींबा दिला होता. यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका थिएटरमधून प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.


या सगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. तो संघर्ष आणखी वाढू नये यासाठी मनसेकडून पदाधिकाऱ्यांना काही सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात केवळ चित्रपटाचे दिग्दर्शकच बोलतील. बाकी कुणी नाही, असे स्पष्ट निर्देश राज यांनी दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०