नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय

अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला.
नेदरलँडच्या विजयानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील समीकरणे बदलली आहेत. इतकेच नाही तर नेदरलँडच्या टीमने पुढील विश्चचषकात आपला प्रवेश निश्चित केला आहे.


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयाने गट २ ची समीकरणे बदलली. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातील विजयीसंघ उपांत्य फेरीत पोहोचेल.


काही वेळातच दोघांमधील सामना सुरू होणार आहे. नेदरलँड्सने प्रथम १५८ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांना १४५ धावांवर रोखले.दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स दोन्ही संघ फक्त एकदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. टी-२० विश्वचषक २०१४ दरम्यान खेळलेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने सहा धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना प्रोटीज संघाने १४५/९ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात नेदरलँड्स १३९ धावांवर सर्वबाद झाले. त्या सामन्यात इम्रान ताहिरने ४/२१ धावा केल्या.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.