हवामानातील बदल कॅन्सरपेक्षाही घातक : यूएनडीपी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या हवामानात जाणवणारे बदल हे कॅन्सरपेक्षाही घातक असल्याचा धक्कादायक अहवाल यूएनडीपीने दिला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. वेळेत कार्बन उत्सर्जनाला प्रतिबंध केला नाही तर जगातल्या काही भागांमध्ये याचे विपरित परिणाम दिसून येतील. जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढतील, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.


यूएनडीपीने सांगितले की, या शतकाच्या अखेर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढू शकते. ह्यूमन क्लायमेट हॉरिझॉनच्या अहवालानुसार हवेतील कार्बन डायऑक्साईडचा स्तर वरचेवर धोकादायक होत आहे. त्यामुळेच जमिनीचे तापमान वाढत आहे. या बदलांना थांबवले नाही, तर हे बदल मानवजातीसाठी हे घातक ठरतील.


संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅब या दोन्ही संस्था वातावरणातील बदलांवर संशोधन करीत आहेत. या समस्येवर केवळ पर्याय शोधून चालणार नाही तर खंबीर पावले उचलावी लागतील. या वातावरणातील बदलांमुळे मानवाचा पुढचा मार्ग अंधकारमय होण्याचा धोका असल्याचे यूएनडीपीने सांगितले.


या अहवालामध्ये ढाका आणि बांगलादेशचे उदाहरण देण्यात आले आहे. येथे उत्सर्जनाचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढेल. यामुळे होणारे मृत्यू हे देशाच्या सध्याच्या वार्षिक मृत्यूदराच्या दुप्पट असू शकतात. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दहापट हे जास्त भीषण असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या