हवामानातील बदल कॅन्सरपेक्षाही घातक : यूएनडीपी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या हवामानात जाणवणारे बदल हे कॅन्सरपेक्षाही घातक असल्याचा धक्कादायक अहवाल यूएनडीपीने दिला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. वेळेत कार्बन उत्सर्जनाला प्रतिबंध केला नाही तर जगातल्या काही भागांमध्ये याचे विपरित परिणाम दिसून येतील. जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढतील, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.


यूएनडीपीने सांगितले की, या शतकाच्या अखेर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढू शकते. ह्यूमन क्लायमेट हॉरिझॉनच्या अहवालानुसार हवेतील कार्बन डायऑक्साईडचा स्तर वरचेवर धोकादायक होत आहे. त्यामुळेच जमिनीचे तापमान वाढत आहे. या बदलांना थांबवले नाही, तर हे बदल मानवजातीसाठी हे घातक ठरतील.


संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅब या दोन्ही संस्था वातावरणातील बदलांवर संशोधन करीत आहेत. या समस्येवर केवळ पर्याय शोधून चालणार नाही तर खंबीर पावले उचलावी लागतील. या वातावरणातील बदलांमुळे मानवाचा पुढचा मार्ग अंधकारमय होण्याचा धोका असल्याचे यूएनडीपीने सांगितले.


या अहवालामध्ये ढाका आणि बांगलादेशचे उदाहरण देण्यात आले आहे. येथे उत्सर्जनाचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढेल. यामुळे होणारे मृत्यू हे देशाच्या सध्याच्या वार्षिक मृत्यूदराच्या दुप्पट असू शकतात. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दहापट हे जास्त भीषण असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड