रिलायन्सच्या सांडपाण्याचा प्रश्न शासनदरबारी

  94

अलिबाग (प्रतिनिधी) : रिलायन्स कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे शेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.


नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाण्यासाठी पाईपलाई टाकण्यात आली आहे. अनेक वर्षे जुनी असलेल्या या वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे केमिकलयुक्त सांडपाण्याची दुर्गंधी पसरत असून भात पिकांवरही त्यांचा परिणाम झाला आहे. या सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रश्नावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या प्रकरणी नुकतीच अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली असून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.


पेण तालुक्यातील वडखळ परिसरातील डोलवी कंपनीमुळे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. याबैठकीला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह माजी आमदार पंडित पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व शेतकरी, जेएसडब्लू कंपनीतील जनसंपर्क विभागातील कुमार थत्ते उपस्थित होते. मात्र, कंपनीचे प्रमुख अधिकारी नसल्याने बैठक रद्द केली गेली.
रोगराई पसरण्याची भीती...


केमिकलयुक्त पाण्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच शेतीचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यामुळे कंपनीने ही पाईपलाईन अन्य जागेतून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग यांच्याद्वारे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील जागेची पाहणी करून त्याचा अहवाल देणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर

कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या