Categories: रायगड

रिलायन्सच्या सांडपाण्याचा प्रश्न शासनदरबारी

Share

अलिबाग (प्रतिनिधी) : रिलायन्स कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे शेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाण्यासाठी पाईपलाई टाकण्यात आली आहे. अनेक वर्षे जुनी असलेल्या या वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे केमिकलयुक्त सांडपाण्याची दुर्गंधी पसरत असून भात पिकांवरही त्यांचा परिणाम झाला आहे. या सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रश्नावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या प्रकरणी नुकतीच अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली असून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

पेण तालुक्यातील वडखळ परिसरातील डोलवी कंपनीमुळे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. याबैठकीला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह माजी आमदार पंडित पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व शेतकरी, जेएसडब्लू कंपनीतील जनसंपर्क विभागातील कुमार थत्ते उपस्थित होते. मात्र, कंपनीचे प्रमुख अधिकारी नसल्याने बैठक रद्द केली गेली.
रोगराई पसरण्याची भीती…

केमिकलयुक्त पाण्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच शेतीचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यामुळे कंपनीने ही पाईपलाईन अन्य जागेतून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग यांच्याद्वारे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील जागेची पाहणी करून त्याचा अहवाल देणार आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago