रिलायन्सच्या सांडपाण्याचा प्रश्न शासनदरबारी

अलिबाग (प्रतिनिधी) : रिलायन्स कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे शेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.


नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाण्यासाठी पाईपलाई टाकण्यात आली आहे. अनेक वर्षे जुनी असलेल्या या वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे केमिकलयुक्त सांडपाण्याची दुर्गंधी पसरत असून भात पिकांवरही त्यांचा परिणाम झाला आहे. या सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रश्नावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या प्रकरणी नुकतीच अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली असून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.


पेण तालुक्यातील वडखळ परिसरातील डोलवी कंपनीमुळे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. याबैठकीला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह माजी आमदार पंडित पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व शेतकरी, जेएसडब्लू कंपनीतील जनसंपर्क विभागातील कुमार थत्ते उपस्थित होते. मात्र, कंपनीचे प्रमुख अधिकारी नसल्याने बैठक रद्द केली गेली.
रोगराई पसरण्याची भीती...


केमिकलयुक्त पाण्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच शेतीचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यामुळे कंपनीने ही पाईपलाईन अन्य जागेतून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग यांच्याद्वारे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील जागेची पाहणी करून त्याचा अहवाल देणार आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग