उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्र


विशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. या नगर परिषदेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शाह यांना पराभवाचा धक्का बसला.


या नगर परिषदेत एक हाती भाजपची सत्ता होती. मात्र यावेळच्या उरण नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडीत भाजपकडून ही नगरपालिका निसटली आहे. तेथे भाजपला २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे. उरण तालुक्यात भूमिपुत्रांचा रोष हा भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवार शोभा शाह यांना मतदारांनी साफ नाकारले आणि या अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत शोभा शाह यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले, असले, तरी या नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले. ही संख्या सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशी असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे.


या निवडणुकीदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार बाळ्या मामा असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, स्वतः या नेत्यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला होता. दुसरीकडे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे जोर लावला असतानाही भाजपला आपले नगराध्यक्ष पद गमवावे लागले. खरे तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे होतेच; परंतु येथे जातीचे, प्रांतवादाचे मुद्देही निर्णायक ठरले, तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही भाजपने विचारात न घेता, भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरला होता. त्याचा परिणाम म्हणून बंडखोर उमेदवार यांनी भाजपची मते आपल्याकडे खेचल्याचे बोलले जाते. गेली १५ ते २० वर्षांची भाजपची सत्ता उलथून एक महिला षंडू ठोकून उभी राहिली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला.

Comments
Add Comment

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव

Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा