उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्र


विशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. या नगर परिषदेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शाह यांना पराभवाचा धक्का बसला.


या नगर परिषदेत एक हाती भाजपची सत्ता होती. मात्र यावेळच्या उरण नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडीत भाजपकडून ही नगरपालिका निसटली आहे. तेथे भाजपला २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे. उरण तालुक्यात भूमिपुत्रांचा रोष हा भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवार शोभा शाह यांना मतदारांनी साफ नाकारले आणि या अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत शोभा शाह यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले, असले, तरी या नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले. ही संख्या सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशी असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे.


या निवडणुकीदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार बाळ्या मामा असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, स्वतः या नेत्यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला होता. दुसरीकडे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे जोर लावला असतानाही भाजपला आपले नगराध्यक्ष पद गमवावे लागले. खरे तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे होतेच; परंतु येथे जातीचे, प्रांतवादाचे मुद्देही निर्णायक ठरले, तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही भाजपने विचारात न घेता, भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरला होता. त्याचा परिणाम म्हणून बंडखोर उमेदवार यांनी भाजपची मते आपल्याकडे खेचल्याचे बोलले जाते. गेली १५ ते २० वर्षांची भाजपची सत्ता उलथून एक महिला षंडू ठोकून उभी राहिली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या