राज्यात १ लाख तरुणांना रोजगाराची संधी - फडणवीस

मुंबई : खासगी कंपन्यांमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी राज्य सरकार कंपन्यांसोबत करार करेल, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणाही फडणवीसांनी केली. आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांच्या हस्ते काही जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली.


ग्रामविकास विभागात साडे दहा हजार जागा


फडणवीस यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार देशभरात १० लाख जणांना शासकीय नोकऱ्या देणार आहेत. राज्यांनीही या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्याला सर्वात पहिले प्रतिसाद महाराष्ट्र राज्याने दिला. त्यानुसार पुढील महिना किंवा सव्वा महिन्यात ग्रामविकास विभागातील रिक्त साडे दहा हजार जागा भरण्याची जाहीरात काढली जाणार आहे.


प्रत्येक विभागाच्या रिक्त जागा भरणार


फडणवीस यांनी सांगितले की, पोलिस विभाग व ग्रामविकास विभागासोबतच शासनाच्या प्रत्येक विभागातील रिक्त जागा भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत पारदर्शीपणाने या जागा भरण्यात येतील. अनेक विभागांच्या परीक्षा घेण्याचे काम एमपीएससीला देण्यात आले आहे.


खासगी कंपन्यांसोबत करार


फडणवीस यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रातही तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लवकरच खासगी कंपन्यांसोबत एक लाख रोजगारांबाबतचे करार (एमओयू) करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवण्यात येतील. त्यातून एक लाख तरुणांना रोजगार मिळेल.


तरुणांना स्वंयरोजगाराचे धडे


राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे स्टार्ट अप पॉलिसी व विविध महामंडळांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येतील. तरुणांना स्वत: पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.


१५ हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात


देशात ८० हजार स्टार्ट अप मधील १५ हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात. रोजगार देणारे स्वयंरोजगार तयार करायचे आहेत. राज्याची स्टार्टअप पॉलिसी तयार केली आहे. स्टार्ट अप तयार करून त्याचा विस्तार करण्यासाठी वित्त पुरवठा करत आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची