रवी राणा, बच्चू कडू यांनी मागितली एकमेकांची जाहीर माफी

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर बच्चू कडू यांनीही त्यांचे शब्द माघारी घेतले आहेत.


यामुळे राणा आणि कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे वेधले गेले होते.


कडु म्हणाले, मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. राणा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे देखील यापुढे वाद नको म्हणून माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. यापुढे सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे कडू यांनी सांगितले. तसेच उद्या कार्यकर्ते एकत्र भेटणार आहेत त्यावेळी पुढील धोरण काय असेल ते जाहीर करु असे त्यांनी सांगितले.


आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची