नाशिकला सलग १४ दिवस विमानसेवा राहणार बंद

Share

नाशिक (वार्ताहर) : ओझर विमानतळावरून हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड कंपनीची विमानसेवा दिली जाते. पंरतु आता या विमानतळाच्या धावपट्टी देखभाल व दुरुस्तीच्या कामानिमित्त २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान सलग १४ दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कुठलीही विमानसेवा दिली जाणार नसल्याने विमान कंपन्यांसह प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

एचएएलने दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात सलग १४ दिवस विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून विमानसेवा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये हवाई वाहतूक संचालनालयच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल दुरुस्ती आणि मजबुती केली जाणार आहे. त्यामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. दरम्यान, नाशिक विमानतळावरून २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत स्पाईस जेट या कंपनीची नवी दिल्ली आणि हैदराबाद ही सेवा देखील बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४ डिसेंबरपासून धावपट्टी नियमित उपलब्ध राहणार आहे.

नैसर्गिक वातावरणाच्या परिणामामुळे शिर्डी विमानतळ हे विमान वाहतुकीसाठी अडचणीचे ठरते. बऱ्याच वेळा विमान उतरवणे अथवा टेक ऑफ करणे शक्य होत नसल्याने विमानसेवा इतर विमानतळावर वळविली जाते. त्यामुळे शिर्डी तिरुपती विमानसेवा नाशिक विमानतळावरून वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा सोमवारी (दि. ३१) ऑक्टोबर रोजी स्पाईस जेट कंपनीच्या वतीने चेन्नई ते शिर्डी विमानसेवा तांत्रिक कारणास्तव शिर्डी विमानतळावर चेन्नईचे येणारे विमान नाशिक विमानतळावर उतरणार आहे.

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

19 minutes ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

57 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

1 hour ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

2 hours ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

3 hours ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

3 hours ago