नाशिकला सलग १४ दिवस विमानसेवा राहणार बंद

  106

नाशिक (वार्ताहर) : ओझर विमानतळावरून हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड कंपनीची विमानसेवा दिली जाते. पंरतु आता या विमानतळाच्या धावपट्टी देखभाल व दुरुस्तीच्या कामानिमित्त २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान सलग १४ दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कुठलीही विमानसेवा दिली जाणार नसल्याने विमान कंपन्यांसह प्रवाशांची गैरसोय होणार आहे.


एचएएलने दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात सलग १४ दिवस विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून विमानसेवा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये हवाई वाहतूक संचालनालयच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल दुरुस्ती आणि मजबुती केली जाणार आहे. त्यामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. दरम्यान, नाशिक विमानतळावरून २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत स्पाईस जेट या कंपनीची नवी दिल्ली आणि हैदराबाद ही सेवा देखील बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४ डिसेंबरपासून धावपट्टी नियमित उपलब्ध राहणार आहे.


नैसर्गिक वातावरणाच्या परिणामामुळे शिर्डी विमानतळ हे विमान वाहतुकीसाठी अडचणीचे ठरते. बऱ्याच वेळा विमान उतरवणे अथवा टेक ऑफ करणे शक्य होत नसल्याने विमानसेवा इतर विमानतळावर वळविली जाते. त्यामुळे शिर्डी तिरुपती विमानसेवा नाशिक विमानतळावरून वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा सोमवारी (दि. ३१) ऑक्टोबर रोजी स्पाईस जेट कंपनीच्या वतीने चेन्नई ते शिर्डी विमानसेवा तांत्रिक कारणास्तव शिर्डी विमानतळावर चेन्नईचे येणारे विमान नाशिक विमानतळावर उतरणार आहे.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.