कहीं खूशी कहीं गम : सोशल मीडियाच्या आयटी नियमांत बदल

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयटी नियंमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नव्या आयटी नियमांअंतर्गत आता ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारताचे आयटी नियम अनिवार्य होणार आहेत. त्यामुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला अल्गोरिदमच्या नावाखाली त्यांची मनमानी करता येणार नाही.


नवीन आयटी नियमांमध्ये वापरकर्त्यांच्या अधिकारांची काळजी घेण्यात आली आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंसा पसरवणाऱ्या पोस्टवर कारवाई करावी लागेल. टेक कंपन्यांना भारताच्या संविधानाचे पालन करावे लागेल. यूजर्सच्या तक्रारींची २४ तासांच्या आत दखल घ्यावी लागेल.


याशिवाय नवीन शासकीय अपील समिती स्थापन (अपीलेट पॅनल) करण्यात येणार आहे. नव्या आयटी नियमांच्या नोटिफिकेशनअंतर्गत ९० दिवसांत शासकीय अपील समिती तयार करण्यात येईल. या समितीत केंद्र सरकारच्या प्रतिनिधीचाही समावेश असेल. या बदलामुळे संवेदनशील कंटेंटवर २४ तासांच्या आत कारवाई करण्यात येईल. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधा असणाऱ्या पोस्टवर कारवाई केली जाईल.



आयटी नियमांचे नोटिफिकेशन जारी


१) नव्या आयटी नियमानुसार, कंपन्यांना सेवा नियम आणि गोपनीयता धोरणाशी संबंधित माहिती त्यांच्या वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन किंवा दोन्हीवर उपलब्ध करून द्यावी लागेल.


२) नवीन आयटी नियमांमधील प्रस्तावित बदलांमध्ये, मध्यस्थ कंपन्यांना भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरी हक्कांचा आदर करणे देखील आवश्यक असेल.


३) तक्रारींचं निवारण करण्यासाठी ७२ तासांचा अवधी दिला जाईल. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याबाबत मध्यस्थ कंपनीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर, ७२ तासांच्या आत प्राथमिक कारवाई केली जाईल.


४) अन्य काही तक्रारींच्या आधारे १५ दिवसांच्या आत अॅक्शन घेण्यात येईल जेणेकरून आक्षेपार्ह कंटेट व्हायरल होता कामा नये.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३