ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग-हर्ष लिंबाचियाविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०२० मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर असले तरी जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची अनेक प्रकरणं समोर आली होती. एनसीबीने तपास सुरू केला तेव्हा अनेक बडे सेलिब्रिटी यात अडकले होते.


एनसीबीने ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच क्रमाने, एनसीबीने नोव्हेंबर २०२० मध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले. यावेळी त्याच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. यानंतर एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक केली होती.


एनसीबीने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगला न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान त्याननंतर १५ हजार रुपये भरुन जामीन मंजूर झाला. तेव्हापासून दोघेही बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने