कुर्ला, भायखळा येथे आगीच्या घटना

  105

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणापासून मुंबईत सुरू झालेले आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी पहाटे कुर्ला येथे, तर दुपारच्या सुमारास भायखळा येथे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सहा दिवसांत फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या ही ६४ झाली आहे. तर एकूण १५५ आगीच्या घटना समोर आल्या आहेत.


दरम्यान, गिरगावात लागलेल्या आगीनंतर शुक्रवारी पहाटे कुर्ला येथे, तर दुपारच्या सुमारास भायखळा येथे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने एका तासातच आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान दिवाळी कालावधीत फटाक्यांमुळे सहा दिवसांत १५५ आगीच्या घटना घडल्या असून यात ६४ घटना फटाक्यांमुळे लागल्या आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्यामुळे दिवाळीचा उत्साह फारसा नव्हता. मात्र यंदा जोरदार दिवाळी साजरी झाल्यामुळे फटाकेही वाजवण्यात आले. या फटाक्यांमुळे यंदा आगीच्या ६४ घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी केवळ ४१ आगीच्या घटना घडल्या. २०२० मध्ये दिवाळीत आगीच्या ३३ घटना घडल्या होत्या.


यंदा २२ ऑक्टोबरला १७ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली असून त्यापैकी २ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी ७ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २४ ऑक्टोबरला ४१ ठिकाणी आगीचे प्रकार समोर आले. त्यापैकी २८ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २५ ऑक्टोबरला ३६ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १२ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २६ आणि २७ ऑक्टोबरला ३४ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १५ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक