मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनंतर आज सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली होती.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तांत्रिक बिघाड दूर केला असून, लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती सुतार यांनी दिली.
एस-३ सीएसएमटी- कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचा-यांनी तत्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी ७.५० वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे, त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकल सेवा पूर्ववत झाली असली, तरी काही काळ लोकल विलंबानेच धावत होत्या. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…