ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना भात कापणीची चिंता

अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात परतीचा पावसाचा जोर काही तालुक्यात कायम असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. दररोज सायंकाळी विजांसह पाऊस पडत असल्याने कापलेले भातपीकही धोक्यात आले आहे. दरवर्षी गणेशोत्सवानंतर बळीराजाला शेत कापणीचे वेध लागतात. मात्र यंदा दिवाळी आली तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाऊस हिरावून नेतो की काय, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.


भातकापणीस आणखी उशीर झाल्यास भाजीपाला लागवडीचा ताळेबंद बिघडेल, या हिशोबाने अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यातील शेतकरी भात कापणीची घाई करू लागले आहेत; तर डोंगराळ भागातील हलव्या वाणाची पिकेही तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस थांबण्याची वाट न पाहता भातकापणीस सुरुवात केली आहे. कापलेला भात चांगला सुकावा म्हणून दररोज परतवून ठेवावा लागतो. त्यानंतर भारे बांधून उडवी रचून तो सुरक्षितपणे ठेवण्यात येत आहे. अशा मेहनतीवर परतीचा पाऊस पाणी फिरवत असल्याने उभी पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.


मळ्यात, खाचरात पाणी साचून आडव्या पिकांच्या लोंबीवरच नव्याने कोंब येण्याची भीती शेतकऱ्याला सतावत आहे. पावसात भात पडून राहिल्यामुळे दाण्यांचीही गळ सुरू झाली आहे. काही ठिकाणी जास्त काळ तयार भात पावसात राहिल्यामुळे तांदूळ काळे पडण्याची भीती शेतकरी वर्गाला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुरूड, श्रीवर्धन, तळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे; परंतु तरीही कृषी विभागाकडून नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. परतीच्या पावसाचे सावट लक्षात घेऊन भातकापणीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी भात कापणीच्या चिंतेत जात आहे.


सध्या हलव्या वाणाच्या पिकाची कापणी सुरू आहे. एकूण ९६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी साधारण सहा हजार हेक्टर क्षेत्रातील भात पिकाची कापणी झाली आहे. गरव्या आणि निमगरव्या वाणाची कापणी काही दिवसांतच सुरू होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच कापणीला सुरुवात करणे, योग्य ठरेल. दिवसभर कापलेला भाताची सायंकाळी लगेच मळणी करता येईल का, याचे नियोजन करावे. यातून शेतकऱ्यांचा खर्च, नुकसानीची शक्यता टाळता येईल.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग