लॉकडाऊन काळात जळगाव जिल्हयात बालविवाहाचे २८ टक्के प्रमाण!

जळगाव (प्रतिनिधी) : बालविवाह ही जागतिक समस्या आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जळगाव जिल्हयात २८ बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले असून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीसह धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युनिसेफच्या माध्यम सल्लागार डॉ. सरिता शंकरन यांनी केले.


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग’ या विषयावरील वेबसंवादात डॉ. सरिता शंकरन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कला व मानव्यविदया प्रशालेचे संचालक प्रा. डॉ.अनिल चिकाटे यांच्यासह पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये, यांच्यासह विनोद निताळे, डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.


या प्रसंगी बोलतांना डॉ. शंकरन म्हणाल्या की, ग्रामीण भागात किंवा अशिक्षित कुटुंबात बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे बालविवाह कायदा आणि बालकांच्या मुलभूत हक्क्कांचे उल्ल्ंघन होते. बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही केवळ शासन, प्रशासनाचीच नाही; तर समाजीतील सर्वच घटकांची असून बालविवाह रोखण्यासाठी अधिक संख्येने युवकांनी त्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


डॉ. अनिल चिकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतात, महाराष्ट्रात बालविवाहाचा प्रश्न अतिशय गंभीर असल्याचे नमूद करून बालविवाह रोखण्यासाठी कायदे असूनही कायदयाचे मोठया प्रमाणावर उल्लंघन होत असल्याबदृल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रास्ताविकात डॉ. सुधीर भटकर यांनी बालविवाह रोखण्यासाठी युवकांचा सहभग महत्वाचा असल्याचे विषद केले.

Comments
Add Comment

Pune Shirur Leopard Attack : 'बिबट्या आला रे!'... आणि होत्याचं नव्हतं होता होता वाचलं! - झोक्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याजवळ बिबट्या, थरार CCTV मध्ये!

पुणे : कधी काळी घनदाट जंगले आणि सुरक्षित प्राणी संग्रहालयांमध्ये पाहायला मिळणारे वन्यजीव आता थेट मानवी वस्तीत

भाजपचा मोठा गेमप्लॅन: नगराध्यक्षपदासाठी 'गुप्‍त' चाचपणी; ऐनवेळी घोषणा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवले; महायुतीचा 'प्लॅन बी' तयार? मुंबई : महाराष्ट्रातील

फडणवीसांनी युतीचा पेच सोडवला! जागा वाटपावर मतभेद असले तरी 'पोस्ट पोल युती' निश्चित

फडणवीसांनी कोल्हापुरात सोडले उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी