संग्रहित छायाचित्र
विकमगड (वार्ताहर) : शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शालेय पोषण आहार ही योजना अमलात आणली. या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार मध्यांतर भोजन दिले जाते. या मध्यांतर भोजन आहार शिजवण्यासाठी काम करणाऱ्या महिला बचत गट व गरजू महिला यांच्याकडून हा आहार शिजवला जातो. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या महिलांना मानधनच मिळाले नसून दिवाळीच्या तोंडावर हे मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण विभागाकडे आग्रह धरला आहे.
विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर शाळांमध्ये हा शालेय पोषण आहार योजना राबवली जात असून या महिलांना दिवाळीत तरी आपले मानधन मिळावे यासाठी त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे. तसेच पूरक पोषक आहार व तेल भाजीपाला इंधन यासाठीही शाळा खर्च करत आहे. परंतु आवश्यक असणारे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून आलेले नाही. त्यामुळे शाळाही किती खर्च करणार, असा प्रश्न शाळेला पडलेला आहे.
दिवाळीनंतर पूरक आहार व तेल भाजीपाला इंधन या सर्वांचे बिल मिळावे असाही आग्रह शाळांनी केला आहे, याबाबत शिक्षण विभागामध्ये चौकशी केली असता शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे मानधन आले असून येत्या एक ते दोन दिवसात त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु इतर लागणारे वस्तूंचे बिलाचे पैसे आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…