बोर्डी : पाऊस उसंत घेत नसल्यामुळे कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना याचा मोठा फटका बसला आहे. मातीची भांडी सुकवण्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे मडकी, दिवे, इतर मातीची भांडी तयार करण्याचे काम मंद गतीने सुरू आहे.
त्यामुळे गुजरात, राजस्थानमधून विक्रीसाठी आलेल्या दिवे व इतर भांड्यांना सुगीचे दिवस आले आहेत. विजयादशमीनंतर जवळजवळ पाऊस काढता पाय घेतो. त्यानंतर शेतातील माती आणून त्याच्यावर प्रक्रिया करून मातीचे दिवे, मडकी इत्यादी भांडी बनवण्याचा कामाला सुरुवात केली जाते. ही सर्व भांडी दिवाळीच्या काळात विक्रीसाठी आणली जातात.
मात्र चालू वर्षी दिवाळी तोंडावर आली असतानाही पाऊस सुरूच असल्याने स्थानिक पातळीवरील कुंभारकामात शिथिलता आली आहे. त्यामुळे राजस्थानमधून आलेल्या मडकी व दिव्यांच्या विक्रीला सुगीचे दिवस आले आहेत.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…