मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडी पुन्हा चौकशी करणार आहे. यात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ७२ संचालकांची चौकशी होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. यामुळे नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाला कळवले आहे. या दाखल याचिकांत अजित पवार यांच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे.
सुरिंदर अरोरा यांनी ७३ पानी याचिकेत आरोप केला होता की, या घोटाळ्याच्या तपासात यंत्रणेने अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशीच केली नाही. यावर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास याचिकाकर्ते आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. मिसर यांनी पुढील तपासासाठी न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे परत करण्याची मागणी करणारा अर्जही दाखल केला आहे. या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होत आहे.
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…