कल्याण-मोहने परिसरात ४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

कल्याण (वार्ताहर) : महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने वीज वाहिनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील १४९ वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.


मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्व्हीस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.


गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मीटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सील तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

Comments
Add Comment

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

बेलापूर : हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामं करायची असल्यामुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान बारा

कॅप्सुल गोळ्यांमध्ये अळ्या!

महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क कल्याण : कल्याणमध्ये अॅसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्यांमध्ये अळ्या

पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची हत्या

भाईंदर : भाईंदर येथे सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराला कारखान्यात धारदार शस्त्राने ठार मारणाऱ्या

चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील

सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या