चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण

नवी दिल्ली : नुकताच जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला. यामध्ये भारताची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या यादीत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचे समोर आले आहे. आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाईड अँड वेल्थंगरहिल्फ या संस्थेतर्फे दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला जातो. त्याप्रमाणे यंदा या संस्थेने जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला आहे.


जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर झालेला असून भारताचा या यादीत १२१ देशांच्या यादीत १०७ वा क्रमांक लागत आहे. भारताचा समावेश गंभीर या श्रेणीमध्ये करण्यात आला असून भारतात उपासमारीची समस्या गंभीर असल्याचे त्यामधून सूचित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारताचा १०१ वा क्रमांक होता. आता त्यामध्ये सहा स्थानांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.


यंदाच्या जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये भारताला २९.१ गुण देण्यात आले आहेत. यामध्ये भारताला गंभीर देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. तसेच या यादीत भारताची सहा स्थानांनी घसरण असून भारताचे शेजारी श्रीलंका (६४), म्यानमार (७१), नेपाळ (८१), बांग्लादेश (८४) आणि पाकिस्तान (९९) हे देश भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आशियाचा विचार करता भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान (१०९) आहे.


जागतिक उपासमार निर्देशांकातील भारताच्या कामगिरीवरुन विरोधी पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान