आवक घटल्याने टोमॅटो महागले

मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे.


सध्या टोमॅटोच्या दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे. एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.


पावसामुळे टोमॅटोचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्यात ३० ते ३२ रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता ३५ ते ४५ रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.