बनावट एबी फॉर्मचा आरोप न्यायालयात; सायन कोळीवाडा वादावर उच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

मुंबई : महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भाजपाच्या बंडखोर उमेदवाराने माघार न घेतल्याने शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, या प्रकरणावर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


सोमवारी नियमित कामकाज सुरू होताच सायन कोळीवाडा मतदारसंघासह विविध निवडणूकविषयक याचिका सुनावणीसाठी मांडण्यात आल्या. मात्र, कोणत्याही याचिकेवर तातडीने सुनावणी घेता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.



नेमकं प्रकरण काय?


शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पूजा कांबळे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्रतीक्षा नगर येथील प्रभाग क्रमांक १७३ भाजपाने शिवसेनेसाठी सोडला असतानाही भाजपाच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळूसकर यांनी तेथून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने अधिकृत एबी फॉर्म दिलेला नसतानाही केळूसकर यांनी कथित बनावट एबी फॉर्म सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.


उमेदवारी अर्ज भरताना यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप दुर्लक्षित करत केळूसकर यांचा अर्ज स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयाला आव्हान देत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.



याचिकेत काय मागणी?


याचिकेत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून भरलेला शिल्पा केळूसकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांना भाजपाचे अधिकृत निवडणूक चिन्ह कमळ देऊ नये, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती.


या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सकाळच्या सत्रात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यानंतर इतरही तत्सम निवडणूक याचिकांवर तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली, मात्र त्यावरही न्यायालयाने नकार दिला.

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :