आशिया चषक २०२३ करीता भारतीय संघ पाकला जाणार?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक २०२३ स्पर्धेकरिता भारतीय संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पण या बाबत अंतिम निर्णय भारत सरकारचा असेल. दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बंद आहेत. दरम्यान आशिया चषक २०२३ चे यजमानपद भूषवण्याची संधी पाकिस्तानला मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला टीम इंडियाला पाठवण्यास तयार आहे. पण या संदर्भातील अंतिम निर्णय हा भारत सरकारचा असेल. सरकारकडून मान्यता मिळाल्यास २००८ नंतर प्रथमच भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानला जाऊ शकतो.


वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान दौरा निश्चितपणे तत्कालीन सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल, परंतु सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अजेंड्यावर नक्कीच आहे. पाकिस्तान २०२३ च्या उत्तरार्धात ५० षटकांच्या आशिया चषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यानंतर भारतात विश्वचषक होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापकाच्या (एजीएम) नोटनुसार, बीसीसीआय पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे.


सामाजिक, राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून खेळली जात नाही. आता दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिल्यास २००८ नंतर प्रथमच भारतीय संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. आशिया चषकाशिवाय आगामी काळात पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषवणार आहे.


१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या बैठकीनंतर(एजीए), बीसीसीआयने गुरुवारी सर्व राज्य संघटनांना एक नोट पाठवली आहे, ज्यामध्ये पुढील वर्षापर्यंतचे भारताचे वेळापत्रक आहे. या नोंदीनुसार, भारताला पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत महिला टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर अंडर-१९ आणि टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक हाही या योजनेचा एक भाग आहे. आशिया चषक पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय प्रकारात होणार आहे. या आशिया चषकानंतर भारतात विश्वचषक होणार आहे.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार

नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला

आयपीएलचा लिलाव पुन्हा परदेशात?

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा परदेशात होणार आहे. २०२६ च्या हंगामासाठीचा हा लघु-लिलाव १५ ते १८ डिसेंबर

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन