बी.एफ.आय.च्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ लोगोचे अनावरण

मुंबई (वार्ताहर) : भारतीय बास्केटबॉलला नवीन उंचीवर नेण्याच्या प्रक्रियेची माहिती देणाऱ्या भारतीय बास्केटबॉलसाठीच्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे मंगळवारी मुंबई शहर साक्षीदार झाले. बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, कोची आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे सहा शहरी संघ आयएनबीएल सीझन २०२२मध्ये, बी.एफ.आय.च्या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय स्पर्धेमधील तीन प्राथमिक फेऱ्यांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे राहतील.


पहिली फेरी १६-२० ऑक्टोबर दरम्यान कोची येथे खेळवली जाईल आणि त्यानंतर सहा दिवसांनी दुसरी फेरी २६-३० ऑक्टोबर दरम्यान जयपूर येथे होईल. तिसरी फेरी पुण्यात ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान बेंगळुरू येथे विजयासाठीचे सामने होणार आहेत. प्रत्येक फेरी ५ दिवसांची असेल ज्यामध्ये ६ संघ उर्वरित सर्व संघांविरुद्ध राऊंड रॉबिनमध्ये एकदा खेळतील. तीन फेऱ्यांमधील स्थाने अंतिम क्रमवारीत जमा होतील जी विजयासाठीच्या सामान्यासाठी मूळ आधार बनतील.


या संघांना बेंगळुरू किंग्स, चेन्नई हीट, चंदीगड वॉरियर्स, दिल्ली ड्रिबलर्स, कोची टायगर्स आणि मुंबई टायटन्स असे म्हटले जाईल. संघांच्या जवळपास असलेल्या जमाव क्षेत्रांतून खेळाडूंना संघांमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोगोंच्या अनावरणाच्या वेळी अरविंद अरुमुगम (बेंगळुरू किंग्स), एम. अरविंद कुमार (चेन्नई हीट), अरविंदर सिंग काहलॉन (चंदीगड वॉरियर्स), दिग्विजय सिंग (दिल्ली ड्रिबलर्स), सेजिन मॅथ्यू (कोची टायगर्स) आणि सिद्धांत शिंदे (मुंबई टायटन्स) यांनी संघांचे प्रतिनिधित्व केले.


रुपिंदर ब्रार, अध्यक्ष, हेडस्टार्ट एरिना इंडिया, म्हणाले, “हा उत्तम उपक्रम सुरू करण्यासाठी बी.एफ.आय.सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील अव्वल दर्जाच्या प्रतिभेसाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्यांना चांगल्या प्रकारे जुळलेल्या विरोधी संघांविरुद्ध त्यांची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

माजी महापौर आणि माजी उपमहापौरांनी गड राखले

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार महापौर आणि तीन उपमहापौर निवडणूक रिंगणात