बी.एफ.आय.च्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ लोगोचे अनावरण

मुंबई (वार्ताहर) : भारतीय बास्केटबॉलला नवीन उंचीवर नेण्याच्या प्रक्रियेची माहिती देणाऱ्या भारतीय बास्केटबॉलसाठीच्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे मंगळवारी मुंबई शहर साक्षीदार झाले. बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, कोची आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे सहा शहरी संघ आयएनबीएल सीझन २०२२मध्ये, बी.एफ.आय.च्या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय स्पर्धेमधील तीन प्राथमिक फेऱ्यांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे राहतील.


पहिली फेरी १६-२० ऑक्टोबर दरम्यान कोची येथे खेळवली जाईल आणि त्यानंतर सहा दिवसांनी दुसरी फेरी २६-३० ऑक्टोबर दरम्यान जयपूर येथे होईल. तिसरी फेरी पुण्यात ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान बेंगळुरू येथे विजयासाठीचे सामने होणार आहेत. प्रत्येक फेरी ५ दिवसांची असेल ज्यामध्ये ६ संघ उर्वरित सर्व संघांविरुद्ध राऊंड रॉबिनमध्ये एकदा खेळतील. तीन फेऱ्यांमधील स्थाने अंतिम क्रमवारीत जमा होतील जी विजयासाठीच्या सामान्यासाठी मूळ आधार बनतील.


या संघांना बेंगळुरू किंग्स, चेन्नई हीट, चंदीगड वॉरियर्स, दिल्ली ड्रिबलर्स, कोची टायगर्स आणि मुंबई टायटन्स असे म्हटले जाईल. संघांच्या जवळपास असलेल्या जमाव क्षेत्रांतून खेळाडूंना संघांमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोगोंच्या अनावरणाच्या वेळी अरविंद अरुमुगम (बेंगळुरू किंग्स), एम. अरविंद कुमार (चेन्नई हीट), अरविंदर सिंग काहलॉन (चंदीगड वॉरियर्स), दिग्विजय सिंग (दिल्ली ड्रिबलर्स), सेजिन मॅथ्यू (कोची टायगर्स) आणि सिद्धांत शिंदे (मुंबई टायटन्स) यांनी संघांचे प्रतिनिधित्व केले.


रुपिंदर ब्रार, अध्यक्ष, हेडस्टार्ट एरिना इंडिया, म्हणाले, “हा उत्तम उपक्रम सुरू करण्यासाठी बी.एफ.आय.सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील अव्वल दर्जाच्या प्रतिभेसाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्यांना चांगल्या प्रकारे जुळलेल्या विरोधी संघांविरुद्ध त्यांची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.