अलिबागमध्ये धान व भरडधान्य खरेदीकरिता पोर्टलवर मुदतवाढ

अलिबाग (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम २०२२-२३ अंतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविले होते. त्यानुषंगाने मंजूर झालेल्या धान व भरडधान्य खरेदी केंद्रावर सब एजंट संस्थांमार्फत धान व भरडधान्य शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती.


परंतु, एनइएमएल पोर्टलवरील मागील हंगामातील दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शेतकरी नोंदणीच्या अहवालानुसार शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या कारणास्तव धान व भरडधान्य खरेदीकरिता एनइएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


त्यानुसार शेतकरी नोंदणी करताना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता लाईव्ह फोटो अपलोड करण्याकरिता स्वतः उपस्थित राहावे. शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.२५ ऑक्टोबर २०२२ असल्यामुळे दिलेल्या मुदतीतच शेतकरी नोंदणी पूर्ण करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी नोंदणीकरिता ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची संबंधित सब एजंट संस्थानी नोंद घ्यावी, असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे सरव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर यांनी सूचित केले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग