नाशिक पाठोपाठ पुण्यातही चालत्या बसने घेतला पेट

Share

पुणे : नाशिकमधील खासगी प्रवासी बसच्या आगीची घटना ताजी असतानाच पुण्यात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास चालत्या खाजगी ट्रॅव्हल बसने पेट घेतला. या बसमधून २६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने थोडक्यात प्रवाशांचा जीव बचावला.

भिवंडी पाये गावातील २६ महिला रात्री अकरा वाजता खासगी बसने भीमाशंकरकडे निघाल्या होत्या. घोडेगावच्या पुढे गाडी आली असता बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरने गाडीतून धूर निघत असल्याचे गाडी चालकाला सांगितले. चालकाने गाडी बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे त्याला दिसले असता त्याने सर्वांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. सर्व महिला गाडीतून उतरल्या आणि काही क्षणात बस जळू लागली. डोळ्यादेखत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला एका ट्रकने धडक दिल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेत १३ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर, ३८ प्रवासी जखमी झाले.

Recent Posts

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…

54 minutes ago

NCERT Textbook Update : सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व…

56 minutes ago

नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं… हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…

1 hour ago

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा  नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…

2 hours ago