गुजरातजवळ पाकिस्तानी बोटीतून ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

सुरत : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ५० किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी ‘अल साकार’ ही पाकिस्तानी बोट पकडली आहे. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार ‘अल साकार’ या बोटीतून ५० किलो हेरॉईन ड्रग्जची खेप भारताच्या दिशेने आणली जात होती. याबाबत माहिती मिळताच आयसीजी आणि गुजरात एटीएसने आज, शनिवारी सकाळी कारवाई करत ही बोट जप्त केली आहे.


अतिशय खराब हवामानातही आयसीजी आणि एटीएसच्या टीमने ही बोट जप्त करून स्थानिक जखाऊ बंदरावर आणली. यावेळी केलेल्या तपासणीत सदर बोटीत ५० किलो हेरॉईन ड्रग्ज आढळून आले.


गेल्या वर्षभरातील आयसीजी आणि एटीएसची ही सहावी संयुक्त कारवाई आहे. तर, आयसीजीने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन एफएम जप्त करण्यात आले होते. यादरम्यान ६ जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)