नोरुमुळे रत्नागिरीत मुसळधार पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी (वार्ताहर) : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे रत्नागिरीत मुसळधार वृष्टी होत आहे. काल, गुरुवारप्रमाणेच आज शुक्रवारीही सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे.


नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा देशातील २० राज्यांना धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आणि गुरुवार सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.


काल पासून दिवसभर मुसळधार सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच जोर कायम ठेवला आहे. रत्नागिरीसह आसपासच्या तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. दसऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत होते. आता वाऱ्याचा वेग मंदावला आहे. मात्र पावसाचा जोर कमी नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. मात्र अजून कोठेही धोकादायक स्थिती नाही.

Comments
Add Comment

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणू आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

"मी इराणला परत जाऊ शकत नाही, ... ते मला मारतील..."; बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिने केलेल्या वक्तव्यामुळे

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

काँग्रेस, उबाठाची अट मान्य केली म्हणून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी ?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे विलिनीकरण होणार नसेल