नोरुमुळे रत्नागिरीत मुसळधार पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी (वार्ताहर) : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे रत्नागिरीत मुसळधार वृष्टी होत आहे. काल, गुरुवारप्रमाणेच आज शुक्रवारीही सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे.


नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा देशातील २० राज्यांना धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आणि गुरुवार सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.


काल पासून दिवसभर मुसळधार सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच जोर कायम ठेवला आहे. रत्नागिरीसह आसपासच्या तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. दसऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत होते. आता वाऱ्याचा वेग मंदावला आहे. मात्र पावसाचा जोर कमी नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. मात्र अजून कोठेही धोकादायक स्थिती नाही.

Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील ८ पंचायत

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

'आनंद दिघेंचे स्वप्न पूर्ण करत आहोत, ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत राहील'

ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी