मुंबई विद्यापीठाच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जागेत गुरुवारी सकाळी मद्याच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. याचबरोबर प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणावर साचल्याने विद्यापीठाची कचराकुंडी झाली का? अशी टीका होऊ लागली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाची मोकळी जागा बस पार्किंगसाठी घेण्यात आली होती. याला युवा सेना, छात्र भरती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी विरोध केला होता. मात्र मुंबई महापालिकेकडून पत्र आल्याने जागा देण्यात आल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली. त्याप्रमाणे बुधवारी झालेल्या सभेसाठी आलेल्या सर्व बसगाड्या विद्यापीठाच्या प्रांगणात पार्क करण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी अनेकजण राहिलेही होते. यावेळी त्यांची जेवणाची तसेच अन्य सुविधा विद्यापीठाच्या प्रांगणात झाल्याने गुरुवारी सकाळी हे संकुल कचऱ्याने भरलेले दिसू लागले.


विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी जाऊन पाहणी केली, तर सर्वत्र कचरा आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. अनेक भागात शौच केल्याने दुर्गंधी पसरल्याचे सावंत यांनी सांगितले. आता हा सर्व कचरा गोळा करून हेलिपॅडवर टाकला जात आहे. तिथे कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गाडीतून नेत असल्याचेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या