कोकणात मुसळधार! विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

  107

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच कोकणात सकाळपासून मुसळधार सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. तरीही आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.


यावर्षी काही ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्ते घरे, जनावरे यांचेही मोठे नुकसान झाले. २३ लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट! कोकण, मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज; IMD ने माहिती दिली

महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून,

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य