मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सीसीटीव्ही दृष्यांमधून मिळते. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा मागून येणाऱ्या तीन गाड्या धडकल्या. गाड्या पाठोपाठ आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर वरळी सी लिंकवर एकच गोंधळ उडाला. याबाबत अधिक तपासणी पोलिसांकडून सुरू असून वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला होता.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…