इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळ आणि हिंसाचारात १२७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन पोलिसांचाही समावेश आहे.
अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात झालेल्या या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत होताच, त्याच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आले नाही. स्टेडियममध्येच डझनभर लोकांचा मृत्यू झाला. उर्वरितांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.
रिपोर्टनुसार, ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येते. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…