निफाड तालुक्यात २१ कुष्ठरुग्ण; चार हजार नागरिकांची तपासणी

नाशिक : कुष्ठ व क्षयरोग विशेष वैद्यकीय तपासणी अभियानात निफाड तालुक्यात एकूण ४१ जण बाधित असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. मागील १५ दिवसांपासून प्रशिक्षित वैद्यकीय पथकामार्फत नागरिकांची तपासणी सुरू होती. एकूण चार हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ पथकाने बाधित व विनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी घोषित केली आहे. त्यात २१ कुष्ठ, तर २० क्षयरुग्ण आढळून आले आहेत.


दरवर्षी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणीसह विशेष अभियानात १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत कुष्ठ व क्षय रग्ण शोधमोहीम अभियान राबविण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ते या प्रशिक्षित पथकाने घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी केली. १० हजार घरांना भेटी देऊन ३७२ प्रशिक्षित पथकाने तपासणी केली.


तपासणीत क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा मोफत एक्स-रे, थुंकी नमुना तपासण्यात आला, तर कुष्ठरुग्णाचा चट्टे तपासण्यात आले. एक हजार ४४१ संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांचे कुष्ठरोगांचे निदान झाले, तर क्षय रुग्णांसाठी दोन हजार ४७३ नागरिकांची थुंकी नुमने तपासले गेले.


त्यात २० जण बाधित आढळले आहेत. कुष्ठरोगांचे ओझर प्राथमिक आरोग्य केद्रांतंर्गत सर्वाधिक कुष्ठरोगांचे चार, तर क्षय रोगांचे दोन नागरिक बाधित आढळले आहेत. यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्तींची तपासणी अधिक प्रमाणात करण्यात आली. निफाड तालुक्यात कुष्ठ व क्षयरोगांच्या नियंत्रणांसाठी आरोग्य विभाग व्यापक तयारी करीत आहे. काही गावांत अधिकाधिक चाचण्या आणि जागृती कार्यक्रम घेत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र