पालघरमध्ये सरपंचपदाचे १६ तर १३४ सदस्यांचे अर्ज अवैद्य

पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १९८२ प्राप्त उमेदवारी अर्जांपैकी १९६६ वैध ठरले असून १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत; तर ३४९० सदस्यांसाठी प्राप्त ९३३५ अर्जांपैकी ९२०१ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून १३४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल अर्जांची छाननी झाली असून यात जात पडताळणीचा दाखला, अर्जावर सह्या नसणे अशा विविध कारणांमुळे अर्ज अवैध ठरवले आहेत. दरम्यान ३० सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहिले हे समोर येणार आहे.


सरपंच पदासाठी अर्ज


तालुका- अर्ज- अवैध


डहाणू - ३८० -२ अवैध
पालघर - ४२९ -०
तलासरी -६२ - -०
वसई - ६५ - १
वाडा - ३१२ -११
विक्रमगड - ३०९ -२
जव्हार - २५७ -०
मोखाडा - १६८ - ०

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार