पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १९८२ प्राप्त उमेदवारी अर्जांपैकी १९६६ वैध ठरले असून १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत; तर ३४९० सदस्यांसाठी प्राप्त ९३३५ अर्जांपैकी ९२०१ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून १३४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल अर्जांची छाननी झाली असून यात जात पडताळणीचा दाखला, अर्जावर सह्या नसणे अशा विविध कारणांमुळे अर्ज अवैध ठरवले आहेत. दरम्यान ३० सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहिले हे समोर येणार आहे.
सरपंच पदासाठी अर्ज
तालुका- अर्ज- अवैध
डहाणू – ३८० -२ अवैध
पालघर – ४२९ -०
तलासरी -६२ – -०
वसई – ६५ – १
वाडा – ३१२ -११
विक्रमगड – ३०९ -२
जव्हार – २५७ -०
मोखाडा – १६८ – ०
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…