कर्जत - मुंबई मध्य रेल्वे मार्गावर वाढते अपघात; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्जत (वार्ताहर) : मागील वर्षभरात कर्जत -मुंबई मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून यामध्ये अनेक तरुणांनी आपला जीव गमवला आहे. यामध्ये विशेषकरून रेल्वे रूळ ओलांडताना तसेच लोकलच्या दरवाजाला लोंबकळून प्रवास करणाऱ्या तरुणांचा जीव गेला आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना रोखण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनापुढे आहे.


कर्जत भिवपुरी रेल्वे मार्गावर ३ सप्टेंबर ला एका अनोळखी तरुणाला रेल्वेची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याचे अंदाजे वय ३५ असून त्याला नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या संदर्भात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे कर्जत पोलिसांनी केले आहे. कर्जत वांगणी रेल्वे मार्गादरम्यान ११ सप्टेंबर रोजी नेरळ स्थानकापासून काही अंतरावर उद्यान एक्स्प्रेसची धडक लागून एका २८ वर्षाचा अनोळखी तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला ठाणे येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर कर्जत-वांगणी- बदलापूर रेल्वे दरम्यान २२ सप्टेंबर रोजी लोकलची धडक लागून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


गेल्या काही दिवसापासून या मार्गावर अनेक जणांना अपघातामध्ये मृत्यू होत आहे. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला याचे कोणतेच गांर्भीय नसल्याचे समोर येत आहे. या मागार्वर अनेक ठिकाणी सिंग्नल असून अनेक जण बिनदिक्कत रुळ ओलंडताना दिसतात. मात्र याकडे रेल्वे तसेच पोलीस प्रशासन कानाडोळा करते. तसेच सकाळी आणि संध्याकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर चाकरमानी स्थानकामध्येच रुळ ओलांडत असतात. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग