शंकर गदई, स्नेहल शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे नेतृत्व

मुंबई (वार्ताहर) : कंकारिया, अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या "३६व्या राष्ट्रीय खेळ" स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले. अहमदनगरच्या शंकर गदईकडे पुन्हा एकदा पुरुष, तर पुण्याच्या स्नेहल शिंदेकडे महिला गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. काही दिवसांच्या सरावानंतर हे अंतिम संघ जाहीर करण्यात आले. भारतीय ऑलम्पिक व गुजरात ऑलम्पिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने व गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.


ईका इरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुल येथे दि. २६ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत या स्पर्धा खेळविण्यात येतील. सध्या हे दोन्ही संघ "छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथील बंदिस्त संकुलातील मॅटवर सराव करीत आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी मंगळवारी हे संघ जाहीर केले.


पुरुष संघ : १) शंकर गदई (संघनायक) - अहमदनगर, २) मयूर कदम - रायगड, ३) असलम इनामदार - ठाणे, ४) आकाश शिंदे - नाशिक, ५) किरण मगर - नांदेड, ६) अरकम शेख - मुंबई उपनगर, ७) पंकज मोहिते - मुंबई शहर, ८) राहुल खाटीक - अहमदनगर, ९) अक्षय भोईर - ठाणे, १०) सिद्धेश पिंगळे - मुंबई शहर, ११) अजिंक्य सुनील पवार - रत्नागिरी, १२) सचिन पाटील - पुणे, प्रशिक्षक : प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक : आयुबखान पठाण, फिटनेस ट्रेनर : पुरुषोत्तम प्रभू.

महिला संघ : १) स्नेहल शिंदे (संघनायिका) - पुणे, २) सोनाली शिंगटे - मुंबई शहर, ३) रेखा सावंत - मुंबई शहर, ४) पूजा शेलार - पुणे, ५)अंकिता जगताप - पुणे, ६) पूजा यादव - मुंबई शहर, ७) सायली जाधव - मुंबई उपनगर, ८) सायली केरीपाळे - पुणे, ९) सोनाली हेळवी - सातारा, १०) निकिता लंगोट - परभणी, ११) मेघा कदम - मुंबई शहर, १२) रक्षा नारकर - मुंबई शहर, प्रशिक्षक : संजय मोकल, व्यवस्थापिका: मेघाली कोरगावकर-म्हसकर, फिटनेस ट्रेनर: वंदना कोरडे.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने