बारामतीच्या महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले त्यांचे बाळ पोरकं झाले आहे.


प्रसुती झाल्यानंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारांसाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना आज (२० सप्टेंबर) पहाटे त्यांचे निधन झाले.


शीतल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ असा परिवार आहे.


दरम्यान, सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातच पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. या महिन्यातच शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या ४१ रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचे ५०९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे पुणे महापालिका हद्दीत एकही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास