नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा एकदा देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियाहून ८ चित्ते भारतात आले.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांना सोडण्यात आले. पंतप्रधानांनी यातल्या मादी चित्त्याचे नामकरणही केले. या मादी चित्त्याचे नाव ‘आशा’ ठेवण्यात आले आहे. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.
नामिबियाहून आलेल्या ८ चित्त्यांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. पंतप्रधानांनी नामकरण केलेल्या मादी चित्त्याचे वय ४ वर्ष आहे. भारतात उतरल्यानंतर या चित्त्यांना फ्रान्स इंडोगो नावाने ओळखले जात होते. फ्रान्स इंडोगो नामिबियाचे व्यावसायिक आहेत. नामिबियातले लक्झरी गेम रिझर्व्ह त्यांच्या मालकीचे आहे. या चित्त्यांना त्यांच्याच संपत्तीतून आणण्यात आले. जंगली जनावर असल्यामुळे या चित्त्यांना सीसीएफ सेंटरमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांना नाव देण्यात आले नव्हते. सीसीएफने पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्त्याचे नामकरण करण्याची विनंती केली.
कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियाहून आलेल्या चित्त्यांना २४ तास पूर्ण झाले आहेत. नॅशनल पार्कमध्ये सोडल्यानंतर हे चित्ते सामान्य वर्तणूक करत आहेत. त्यांनी शिकार केली आणि झोपही पूर्ण केली. पहिल्या दिवशी नवीन परिसर बघून थोडे घाबरलेले होते, पण आता त्यांचे आचारण सामान्य आणि सकारात्मक दिसत आहे, असे नॅशनल पार्ककडून सांगण्यात येत आहे. सगळे चित्ते नॅशनल पार्कमध्ये आरामात फिरत आहेत, या सगळ्या चित्त्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…