कावळ्यांची संख्या घटली; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले

वसंत भोईर


वाडा : कधीकाळी शहरासह गावखेड्यात प्रत्येक वस्तीत सकाळ, सायंकाळ कावळ्यांची काव... काव... ऐकू येत असे. परिसरातील मोठ्या झाडांवर तर कावळ्यांची शाळाच भरायची. पण सध्या ग्रामीण भागासह शहरात कावळे दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले आहेत.


११ सप्टेंबरपासून पितृपक्षात सुरुवात झाली आहे. पितृपक्षात कावळ्यांना श्राद्धभोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरूड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला, तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. नदीकिनारी असलेल्या दहन घाटांचा अपवाद सोडला, तर वस्त्यांमध्ये सहसा कावळे पाहायला मिळत नाहीत.


वाढत्या बांधकांमामुळे झाडे तोडण्यात आली. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. गर्दीच्या भागात तर कावळ्यांसह इतर पक्षीही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे पितृपक्षात अन्नघास भरवण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.


ज्या भागात मोठ्या वृक्षांची संख्या जास्त असते, तेथे कावळे दिसून येतात. बांधकामांसाठी व जंगलातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे कावळ्यांनीही आपला आधिवास बदलला आहे. शिवाय कावळ्यांसह पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या चिंताजनक आहे. - श्रीकांत ढालकर, पक्षीमित्र

Comments
Add Comment

बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राशपचे आस्ते कदम, जाहीर केली पहिली यादी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

आताची सर्वात मोठी बातमी: अर्थव्यवस्थेतील 'फंडामेटल' अतिशय मजबूत - RBI २०२४-२५ वार्षिक अहवाल

मोहित सोमण: 'भारताची अर्थव्यवस्था मजबूत फंडामेंटलसह जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून आपले मार्गक्रमण सुरू

IIP November Data: 'मोदी' सरकारच्या काळात आणखी एक विक्रम, नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात दोन वर्षांतील विक्रमी वाढ!

मोहित सोमण: आज भारत सरकारच्या सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाची नोव्हेंबर महिन्यातील

मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबई : “टाटा सामाजिक