पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आघाडीबाबत मोठी अनिश्चितता होती. कधी आघाडी होणार, तर कधी ती तुटल्याच्या बातम्या येत होत्या. आज या सर्व नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चिन्हाबाबतची अट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हांवर - ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’- निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे चिन्हांवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.


पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षाने आघाडीत ६५ जागांची मागणी केली होती, तर अजित पवार यांच्या पक्षाकडून ३५ जागांची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर जागावाटपावर तोडगा निघाला असून पुणे महापालिकेत अजित पवार यांचा पक्ष १२५ जागा, तर शरद पवार यांचा पक्ष ४० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच आघाडीचा अंतिम फॉर्म्युला असणार असल्याची चर्चा आहे.


दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, घोषणा होताच अजित पवार यांच्या पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे. यासाठी अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. सध्या दहा ते पंधरा जागांवरील उमेदवारीचा तिढा बाकी असून, त्यावर चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती