हरिहर गडावर वाट चुकलेल्या ट्रेकर्सची गिर्यारोहकांच्या टीममुळे यशस्वी सुटका

त्र्यंबकेश्वर (वार्ताहर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर वाट चुकलेल्या ट्रेकर्सची वनविभाग गिर्यारोहकांच्या टीमने यशस्वीरित्या सुटका करत त्यांना सुखरूप परत आणले.


गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच मध्यंतरी पर्यटनाला बंदी घातल्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे चित्र होते. मात्र पुन्हा एकदा पर्यटकांनी आपला मोर्चा त्र्यंबक परिसरातील पर्यटनस्थळांकडे वळविला. यातच येथील हरिहर गडावर वाट चुकल्याने अडकून पडलेल्या चौघा मित्रांची वनविभाग गिर्यारोहकांच्या टीमने यशस्वीरित्या सुटका केली.


नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहरगड येथे मालेगाव येथून पर्यटनासाठी आलेले चार जण उतरताना वाट चुकल्याने अंधारामुळे अडकल्याची घटना रात्री उशिरा घडली. दरम्यान वेळीच संपर्क झाल्याने वनरक्षक, वनमजूर बचाव पथकाने त्यांना रात्री उशिरा गडाखाली सुखरूप उतरवले. रात्रीच्या वेळी गडावर दाट धुके असल्याने हे पर्यटक अडकून पडले होते. मात्र यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


याच पार्श्वभूमीवर मालेगाव येथून पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांना मात्र गडावरून उतरताना वाट सापडली नाही. वाट चुकल्याने ते भरकटले. शेवटी स्थानिक तरुणाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर या चौघांना खाली आणण्यास मदत झाली. यासाठी वनविभाग आणि गिर्यारोहकांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवित वाट चुकलेल्याना सुखरूप खाली आणले.

Comments
Add Comment

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; फडणवीसांकडून मोठी भेट, २५०० रोजगार निर्माण होणार

पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

Palghar: पालघरच्या ५० हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी मिळणार

पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक

अरबी समुद्रात वाऱ्यांनी बदलली दिशा, मार्च हीटचा चटका, पावसाबाबत काय अंदाज?

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात

मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.