पालिकेतील बदल्यांमुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सत्ता बदल झाला की, आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात हे नेहमीचेच आहे. मात्र सध्या मुंबई महापालिकेत बदल्या केल्या जातात आणि काही दिवसांतच पुन्हा त्याच अधिकाऱ्याला जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त केले जात आहे. यामुळे पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे.

विशेष म्हणजे ठाकरे सरकार होते त्यावेळीही आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या होत्या. इतकेच नाही तर गेले २५ वर्षे पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या ठिकाणी बदल्या केल्या जात असल्याची चर्चा होती. मात्र आता सत्ता बदलताच पुन्हा एकदा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच बदल्या केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्याच अधिकाऱ्यांना जुन्या नियुक्तीवर नियुक्त केले जात आहे. यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या घन कचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांची झोन १ मध्ये, तर चंदा जाधव यांची बदली घन कचरा विभागात करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्यांना आधीच्याच जागी नियुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त पदावर करण्यात आली होती, तर या पदावरील संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी करण्यात आली. काही दिवसांत या दोघांकडे पुन्हा एकदा त्यांच्या आधीच्या पदाचाच भार देण्यात आला. सह आयुक्त अजित कुंभार यांची पुन्हा शिक्षण विभागात, रमेश पवार यांची सुधार विभागात, केशव उबाळे यांची उपायुक्त दक्षता या विभागात पुन्हा नियुक्ती केली आहे. तर किरण दिघावकर यांची दादर येथून भायखळा आणि नंतर बोरिवली येथे बदली केली आहे. मात्र बदल्या करून काही तासांत पुन्हा त्या रद्द केल्या जात असल्यामुळे राजकीय वर्तुळात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

14 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

40 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago