‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा एकदा रोहित शर्माच्या देशभक्तीची झलक पाहायला मिळाली असून, ‘हिटमॅन’चा एक भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. मात्र व्यस्त क्रिकेट वेळापत्रक असूनही त्याने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत मुलगी समायराच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमादरम्यान घडलेला एक क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


शाळेच्या वार्षिक सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभक्तीपर गाण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमात जेव्हा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेले ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गीत सादर करण्यात आले, तेव्हा वातावरण भारावले होते.


व्हिडीओच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हेही गाणं ऐकत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर कॅमेरा रोहित शर्माकडे वळतो आणि त्याच क्षणी रोहित भावूक झालेला पाहायला मिळतो. गाण्याचे शब्द कानावर पडताच रोहितच्या डोळ्यांत अश्रू तरळू लागतात. तो आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र त्याचे डोळे डबडबलेले आणि लाल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.


‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं सुरू असताना रोहित शांतपणे बसून ते ऐकत होता. हा क्षण पाहून अनेक चाहत्यांना भारताच्या टी-२० वर्ल्ड कप विजयानंतरचा तो प्रसंग आठवल्याशिवाय राहिला नाही, जेव्हा रोहित शर्माने तिरंगा हातात घेऊन मैदानात विजयाचा जल्लोष केला होता.


या देशभक्तीपर गाण्याने रोहितला पुन्हा एकदा भावूक केलं असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून रोहितच्या देशप्रेमाचं कौतुक केलं जात असून, ‘हिटमॅन’चा हा भावूक क्षण अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त