काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेने आघाडीची साथ सोडल्याने आता काँग्रेस पक्षाने एकला चलो रेचा नारा दिला होता. परंतु काँग्रेसचे मागील काही वर्षांत झालेले अध:पतन लक्षात घेता अनेक ठिकाणी त्यांना उमेदवारही मिळत नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजनमधील आघाडी निश्चित झाली असून वंचितच्या वाट्याला साठ पेक्षा अधिक जागा जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून मुंबईतील साठ पेक्षा अधिक जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेससोबत वंचित बहुजन गेल्यास यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडले जाण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा शिवसेना आणि मनसे एकत्र आले असून भाजपा आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. त्यामुळे मनसे उबाठासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गेल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वबळाव निवडणूक लढण्याचा निर्धार केला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काँग्रेससोबत आघाडीची तयारी दर्शवल्यामुळे दोन्ही वाटपातील जागा वाटपांवर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. काँग्रेसने सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीला ४८ जागा देण्यास तयारी दर्शवली होती. परंतु या जागा कमी असल्याने अधिक जागांची मागणी केली होती. परंतु आता काँग्रेस पक्षाने, वंचितला मुंबईतील ६० जागा सोडण्याचा निश्चय केल्याची माहिती मिळत आहे. वंचितला सोडण्यता येणाऱ्या साठ जागांवर जवळपास एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

वंचित बहुजन आघाडीची स्थापना २०१९ची असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत ते प्रथमच उतरणार आहेत. सन २०१९ आणि त्यानंतरच्या २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली असली तरी प्रथमच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या मदतीने उबाठा शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर उबाठाने काँग्रेसची साथ सोडली आहे. परंतु काँग्रेसला साथ देण्यास प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजनचे मतदान एकत्र झाल्यास काँग्रेसच्या उमेदवारांचे मतदान वाढले जाणार आहे. त्यामुळे दोन्हींच्या एकत्रित मतदानामुळे काँग्रेसचा आणि पर्यायाने वंचितचा फायदा होवू शकेल. यंदाच्या महापालिकेत वंचितचा नगरसेवक काँग्रेसच्या मदतीने निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Add Comment

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स