नाशकात वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार : बावनकुळे

नाशिक : नाशकात वारकरीभवन उभारण्यास आपण सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी ५ कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.


नाशिक दौऱ्याच्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप साहेब यांच्या औरंगाबाद रोडवरील फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माऊली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना बावनकुळे बोलत होते.

नाशकात वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र भवन नसल्याने त्यांची फारच कुचंबणा होते असे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव देशमुख, हभप ज्ञानेश्वर जय्यतमहाल, हभप सुभाष जय्यतमहाल, हभप राजेंद्र खैरनार, नानासाहेब पवार, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर निमसे यांनी निदर्शनास आणताच त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवा बाकीचे मी बघून घेतो असे बावनकुळे म्हणाल्याने वारकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


यावेळी बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सिमा हिरे, आ राहुल ढिकले, भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, ज्येष्ठ नेते विजय साने, शहराध्यक्ष गिरिश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मछिंद्र सानप, कमलेश बोडके, सौ सुनिता पिंगळे, प्रशांत जाधव, सुनील केदार, जगन पाटील, पवन भगुरकर, शामराव पिंपरकर, अमित घुगे, नाना शिलेदार, ज्ञानेश्वर पिंगळे, दिगंबर धुमाळ, चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील फडताळे, महेंद्र कराड, सुरेश निमसे, राहुल कुलकर्णी, सतनाम राजपूत, दीपक सानप, धनंजय पुजारी, उत्तम उगले, संजय संघवी मंदा फड, प्रियंका कानडे, स्मिता मुठे, चंद्रकला धुमाळ, सविता सिंग, पूनम परदेशी आदी उपस्थित

Comments
Add Comment

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,

Madgaon Tejas Express : तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्याऐवजी बिस्किट पुडा! IRCTCकडून कंत्राटदाराला दणका!

मडगाव : मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (Madgaon Tejas Express) प्रवाशांना दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत